बारावीनंतर दहावीचा निकाल कधी? मोठी अपडेट आली समोर..


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मेला जाहीर झाला. महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण निकाल ९१.८८ टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे.

तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच १० वीचा निकाल जाहीर होतो, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे दहावीचा निकाल १५ मे २०२५ पूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप मंडळाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान झाली. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आले. त्यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची शक्यता आहे.

शिक्षण मंडळाकडून संकेत देण्यात आले आहेत की निकाल जाहीर करण्याआधी अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी mahresult.nic.in या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहणे गरजेचे आहे.

येथे पाहता येईल निकाल..

mahresult.nic.in
www.mahahsscboard.in
mahahsscboard.org
hscresult.mkcl.org

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!