उरुळी कांचनमध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी लोणी काळभोर पोलिसांचा रुट मार्च…!


उरुळी कांचन : आगामी हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद सण सण, उत्सवांच्या काळात उरुळी कांचन ग्रामपंचायत भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने लोणी काळभोर पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला.

यादरम्यान काढण्यात आलेल्या पोलिसांच्या पथसंचलनाने परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, किरण धायगुडे, इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अशांतता निर्माण करणाऱ्यांसाठी आम्ही सदा तत्पर आहोत, तसेच कोणी समाज कंटक अशांतता निर्माण करण्याची शक्यता असते. याच दृष्टीकोणातून अशी अशांतता निर्माण करणाऱ्यांना समज द्यावी म्हणूनच पोलीस विभागाने रुट मार्चचे आयोजन केले होते.

दरम्यान, सदर रुट मार्च दरम्यान नागरीकांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच पोलिस मदतीसाठी ११२ या नंबर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!