सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आले, तलावात बैल धुवायला गेले अन्… दोघांचा बुडून मृत्यू, घटनेने हळहळ..

छत्रपती संभाजीनगर : मामाच्या गावी आलेले तिघे बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली आहे. मामाच्या गावी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यासाठी तर धाडस करून मुलाचा जीव वाचवणाऱ्या मुलीचं कौतुक होत आहे.
अखिल शकील पठाण (वय.१८, राहणार नांदगाव तांडा), रेहान भिकन शेख (वय.१५ सातगाव डोंगरी तालुका पाचोरा) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर शाकीप कलंदर पठाण (वय. १३ राहणार घाटनांद्रा तालुका सिल्लोड) असं जीव वाचलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने रेहान भिकन शेख हा सोयगाव तालुक्यात नांदगाव तांडा येथे राहणाऱ्या शकील पठाण यांच्याकडे आला. तर, सकीप अलकंदर पठाण हा त्याच्या बहिणीकडे आला होता. दरम्यान, अखिल, रेहान, साकिब हे तिघे भिकन शेख यांना न सांगताच बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावावर गेले.
बैल भूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. यावेळी शेजारी कपडे धुत असलेल्या मनीषा कैलास बागुल या १८ वर्षीय तरुणीला ही बाब लक्षात आली. तिने प्रसंगावधान राखत थेट तलावात उडी घेतली. तब्बल २३ मिनिटे पोहत मनीषा तलावात मुलांचा शोध घेत होती. अखेर तेरा वर्षीय साकीब हा मनीषाच्या हाती लागला.
तिने अथक प्रयत्न घेऊन साकीबला पाण्याच्या बाहेर काढले. हा थरारक प्रसंग पाहून महिलांनी आरडाओरड सुरू केला. यामुळे गावकरी तलावाजवळ जमले. यावेळी पाण्यात बुडालेल्या अखिल आणि रेहान या दोन मुलांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले.