पाकिस्तान चारही बाजूने अडकली!! बलुचिस्तानमधूनही पाकिस्तानवर मोठा हल्ला, पोलीस चौक्या घेतल्या ताब्यात…


नवी दिल्ली : पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी आता चांगलीच जिरणार आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर आता बलुच लिबेरन आर्मीला सुद्धा सत्तर हत्तींचे बळ आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत.

तसेच बलुचिस्तानमधील स्वतंत्रतेसाठी लढणाऱ्या बलुच आर्मीने पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तान सरकारला धक्का बसला आहे, आणि देशाच्या आतर्गत संघर्षाची स्थिती आणखी तीव्र झाली आहे. बलुच आर्मीने अनेक पोलिस चौकांवर ताबा घेतल्याचा दावा केला आहे आणि या चौकांवर त्यांचा स्वतंत्र झेंडा फडकवला आहे.

दरम्यान, बलुचिस्तानमधून येणाऱ्या माहितीनुसार, बलुच आर्मीने पाकिस्तानी वायुसेनेच्या दोन अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. यासोबतच, बलुचिस्तानकडून पाकिस्तानला गॅस पुरवठा करणारी एक महत्त्वाची पाईपलाइनही उडवण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये मोठा धक्का दिला आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या स्थितीत मोठ्या बदलांची शक्यता निर्माण केली आहे.

बलुचिस्तानमध्ये सुरू असलेला हा संघर्ष पाकिस्तानच्या अंतर्गत असलेल्या विविध समस्यांचा एक भाग आहे. बलुचिस्तान राज्याच्या स्वातंत्र्यसाठी लढणारे अनेक गट पाकिस्तानच्या विरोधात आहेत. या संघर्षामुळे पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य, दोन्हीचं आव्हान वाढलं आहे.

बलुच आर्मीने आता देशाच्या हृदयात घुसून मोठे हल्ले करण्याची शरद केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेच्या प्रणालीला मोठा धक्का बसला आहे. या संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बलुचिस्तानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानला धक्का दिला असून, त्यांची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. भविष्यात हा संघर्ष आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे,

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!