हवामान खात्याने दिला महाराष्ट्रात अलर्ट!! शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्वाचे, जाणून घ्या…

पुणे : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा काही नेम नाही. काही भागांत पावसाच्या सरी तर काही जिल्ह्यांत उष्णतेने त्रस्त नागरिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. कोकण क्षेत्र, मुंबई आणि काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि दमट हवा जाणवेल. विशेषतः, मुंबईत पावसाच्या सरी कमी होण्याची शक्यता आहे, पण अन्य भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांच्या आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटांचा धोका एप्रिल महिन्यात जास्त राहू शकतो. हवामान विभागाने सूचित केले आहे की, एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटा महाराष्ट्रात वाढू शकतात. विशेषत: उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या उष्णतेमध्ये सलग दोन ते पाच दिवस तापमान खूपच वाढण्याचा अंदाज आहे.
उष्णतेच्या लाटांचा धोका..
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उष्णतेच्या लाटांमध्ये लोकांनी बाहेर न जाणे आणि शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये. तसेच, भारतातील इतर भागांमध्येही उष्णतेच्या लाटा असल्याचा इशारा दिला आहे.