Manoj Jarange Patil : आम्ही 13 तारखेपर्यंत आशा ठेवून, नंतर….!! मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा एकदा इशारा


Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मराठवाडा दौ-यासाठी अंतरवाली सराटीतून आज सकाळी ७:१५ वाजता रवाना झाले आहेत. मराठवाडा दौ-यावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर ७ दिवस नाही, २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असेत, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. Manoj Jarange Patil

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!