ती गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत!!! उद्धव ठाकरे फडणवीसांवर कडाडले…


मुंबई : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांचे नाव घेताना देखील सन्मानिय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीवरून केलेल्या वक्तव्यावर टीका केली. विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करतो.

राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी आलो आहेत, असे उद्धव यांनी म्हटले. उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती.

मुंबई आपल्या हक्कांची आहे लढलो आणि आपण घेतली. काश्मीर मध्ये 370 कलम हटवायला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. एक देश, एक भाषा म्हणून हिंदी सक्ती आम्ही लागू करून देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!