राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांत तापमान आणखी वाढणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..


पुणे : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. तसेच राज्यात उन्हाने होरपळ होत असून बहुतांश शहरातील पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळं हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत तापमान दोन ते तीन अंशाने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची काहिली केली आहे.

गेल्या तीन दिवसांतच पाऱ्याने ४० हून ४५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील लोकांना घरातून बाहेर पाय काढणे मुश्किल झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई आणि उपनगरांत रविवारी सामान्य तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह २० राज्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, विदर्भात उष्णतेचा प्रकोप सुरूच असून विदर्भात चंद्रपूरमध्ये आज सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे चंद्रपूर मध्ये 44.6°c तापमान असून विदर्भात पाच जिल्ह्यांमध्ये पारा 44च्या वर तापमानाचा पारा पोहोचला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!