पूर्व हवेलीत गिरीश बापटांच्या अजोड कामगिरीचा उजाळा ! आजारी असतानाही सोरतापवाडीच्या नूतन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे केले होते उद्घाटन…!

उरुळी कांचन : जयदीप जाधव
पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट यांचे दिर्घ आजारपणाने गुरूवार (दि.२९) रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळातील दमदार कामगिरीने प्रामुख्याने जुन्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा काढला आहे. प्रकृती अनास्था असतानाही त्यांनी पूर्व हवेली तालुक्यातील प्रश्न सोडविण्याची तसेच विकासकामांना मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्नांचे जनतेकडून स्मरण होऊ लागले आहे.
पालकमंत्री पदाच्या काळात पूर्व हवेली तालुक्यातील जुना बेबी कालवा सुरू करण्याचा प्रयत्न असो, की खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळेत मिळण्याची मागणी असो की ,तरडे येथील भारत पेट्रोलियमचे साठवणूक केंद्र विकसित करण्यात त्यांचा पुढाकार या भागात जनतेकडून स्मरण केला जात आहे.
पूर्व हवेली तालुक्यात बिगर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या अनुभवाच्या पश्चात शहरी राजकारणाची नाळ असलेला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या रुपाने हवेली तालुक्याने अनुभवला आहे. शहरी राजकारणाच्या वळचळणीचा पालकमंत्री ग्रामीण भागातील प्रश्न कसा प्रश्न सोडवू शकतो , अशा प्रश्नांना पूर्व हवेली तालुक्यात धडाकेबाज निर्णय घेऊन, गिरीश बापट यांनी आपल्या अभ्यासू अनुभवीची प्रचिती ग्रामीण भागात जनतेला दाखविली. ग्रामीण भागातील जनतेला बापट साहेब हे शेतकऱ्यांसंबंधीत प्रश्न सोडवितील काय या अपेक्षांना त्यांनी कामातून उत्तर दिले.
२०१४ साली भाजप व शिवसेना सरकार सत्तेवर येताच, त्यांनी पूर्व हवेली तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या जुन्या बेबी कालव्यासाठी मुख्यमंत्री आकस्मिक निधी द्ववारे २१ कोटींचा निधी वितरीत करीत जुना बेबी कालवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कालव्याद्वारे खडकवासला प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असताना त्यांनी जुन्या बेबी कालव्याद्वारे शेतीची भूक भागविता आली. तसेच या ठिकाणी विस्तीर्ण झालेल्या नर्सरी उद्योगाला या कालव्याचे पाणी तत्कालीन परिस्थितीत वरदान ठरले आहे. आजही या कालव्याच्या पाण्याने शेतीचा पाण्याचा मूळ प्रश्न मिटला आहे. त्याचबरोबर गिरीश बापट यांच्या काळातच जिल्हा प्रशासनाच्या अचूक नियोजनाने त्यांनी अत्यल्प काळात त्यांनी तरडे येथील पुणे जिल्ह्यात आवश्यक असलेला भारत पेट्रोलियम च्या तेल साठवणूक केंद्राचा जलद उभारणीची प्रक्रिया बापट यांच्या सूचनेनंतर प्रत्यक्षात येत होती.
गिरीश बापट यांची पालकमंत्रीपदाची अभ्यासू बाब म्हणजे शहरी भागाचे नेतृत्व असताना त्यांनी खडकवासला प्रकल्पातून शेतीला पाणी वाटपात दिलेले झुकते माप जनतेच्या स्मरणात आहे. वर्षे २०१६ व २०१७ मध्ये पाणीबाणीच्या परिस्थिती तही त्यांनी शेतीच्या पाण्याचे अचूक नियोजन साधले होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नात त्यांना प्रश्न सोडविण्याची तळमळ होती. तसेच पूर्व हवेलीतील फूल व नर्सरी उद्योगाबद्दल स्थानिकांनी केलेल्या प्रगतीचा उल्लेख त्यांनी आवर्जून जिल्ह्यातील अनेक भागात केलेला उल्लेख आठवणींना आवर्जून उजाळा मिळत आहे.
स्व. पाचर्णे व बापट ठरले दो हंसोका जोडा !
पूर्व हवेली तालुक्यात जेजुरी ते बेल्हे मार्ग व अष्टविनायक मार्गातील थेऊर ते लोणीकंद या दर्जेदार मार्गांची उभारणी आज स्व. तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नातून झाली आहे. तसेच लोणी काळभोर परिसरात आठ गावांत स्मार्ट व्हिलेज योजने अंतर्गत विकासाचा क्लस्टरसाठी दिलेला निधी आदी ठळक कामे पाचर्णे व बापट यांच्या प्रयत्नांतून झाली. विशेष बाब म्हणजे या जोडीगोळीच्या सोरतापवाडी गावावर विशेष प्रेमाने हे गाव कोट्यवधींचा निधी मिळवून सर्व आघाड्यांवर विकासाचे मॉडेल ठरले आहे.
आजारी असताना उद्घाटनास हजेरी
पूर्व हवेली तालुक्यात पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना गिरीश बापट यांनी सोरतापवाडी गावावर विशेष प्रेम दाखविले आहे. त्यांच्या विशेष निधीतून रस्ते, ट्रेट लाईट व इतर विकास कामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. बापटांनी सढळ हाताने निधी वितरीत केल्याने या ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुदर्शन चौधरी यांच्या आग्रहाखातर आजारपणात त्यांनी सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे त्यांनी उद्घाटनाचा क्षण ग्रामस्थ आठवणींनी काढत आहेत.