ब्रेकिंग! पाकिस्तानचा भारतावर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने पाकिस्तानी मिसाइल्स, ड्रोन्स पाडले, सीमेजवळ मोठा थरार…


नवी दिल्ली : सध्या भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. असे असताना पाकिस्तानने काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या सर्तक असलेल्या सैन्यदलांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यामुळे मोठी घटना टळली आहे.

पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताने आपल सुदर्शन चक्र S-400 वापरलं. एस-400 ही भारताची मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या सिस्टिमने पाकिस्तानकडून येणार मिसाइल्स, ड्रोन्स पाडले. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज याठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताने फक्त त्याच ठिकाणांना टार्गेट केलय, जे काल रात्रीच्या हल्ल्यासाठी जबाबदार होते. पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइलद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या कराची, गुंजरावाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन अटॅक झालाय. ड्रोन अटॅकमुळे या भागात इमर्जन्सी सारखी स्थिती आहे.

भारताने केलेल्या कारवाईत लाहोरची एअर डिफेन्सची सिस्टिम उद्धवस्त केली. पाकिस्तानने ही सिस्टिम चीनकडून खरेदी केली होती. कोणीही अजून या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच उमरकोटमध्ये सुद्धा ड्रोन ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. सर्वात जास्त 3 ड्रोन ब्लास्ट लाहोरमध्ये झाले आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार आतापर्यंत पाकिस्तानात एकूण 12 बॉम्बस्फोट झाले आहेत. लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन बलास्ट झाले आहेत. पाकिस्तानच्या अपयशी हल्ल्यानंतर भारताने गुरुवारी प्रत्युत्तर दिलं. भारताची कारवाई संतुलित असल्याच संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!