ब्रेकिंग!! देशात होणार जातीय जनगणना, मोदी सरकारचा मोठा निर्णय…


नवी दिल्ली : मोदी सरकार जातीय जनगणना करणार असल्याचा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात  निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये मुख्य जनगणनेतच जात जनगणना केली जाईल. एका बैठकीत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. आता संपूर्ण देशभरात जातीय जनगणना केली जाणार आहे. याबाबत अश्वीनी वैष्णव म्हणाले की, काँग्रेस सरकारने प्रत्येकवेळी जातीय जनगणनेला विरोध केला आहे. १९४७ पासून जातीय जनगणना झालेली नाही.

तसेच काँग्रेसने जातीय जनगणनेऐवजी जातीय सर्वेक्षण केले. यूपीए सरकारच्या काळात अनेक राज्यांनी राजकीय दृष्टिकोनातून जात सर्वेक्षण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!