मणिपूर मध्ये पुन्हा रक्तरंजित घटना, अज्ञातांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू..

इंफाळ : नवीन वर्षात मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितनुसार, सोमवारी (ता.१) काही लोक लिलॉन्ग चिंगजाओ भागात आले आणि त्यांनी स्थानिक लोकांवर गोळीबार केला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या हिंसाचाराचा पूर्णपणे निषेध केला आहे. तसेच त्यांनी लिलाँगमधील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यानंतर संतप्त जमावाने तीन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. या गाड्या कोणाच्या आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.सध्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम पोलीस करत आहेत. तसेच लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून, १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोक जखमी झालेत. बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या मागणीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला तेव्हा हिंसाचार झाला.