मोठी बातमी! भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 केली स्थगित..


नवी दिल्ली : सध्या बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता आयपीएल 2025 स्थगित करण्यात आलीआहे. बीसीसीआय लवकरच यासंदर्भात घोषणा करू शकते. बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले.

यामुळेसध्या देशात वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या हल्ल्याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सीझनमधील 58 वी मॅच सुरू होती, ती मध्येच थांबवण्यात आली. तसेच खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारताने पाकिस्तानच्या एकाही लष्कराच्या तळाला धक्का न लावता दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले होते. गुरूवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतावून लावला.

पाकिस्तानवाल्यांनी आपली लायकी दाखवली आणि भारताच्या सीमाभागांवर हल्ला केला. आपल्या लोकांवर हल्ला केल्यावर भारतीय लष्करानेही बाह्या सरसावल्या आणि पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या युद्धामुळे भारताने अंतर्गत खबरदारी घेतली असून सीमाभागांमध्ये ब्लॅकआऊट आणि देशातील २६ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला.

याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यांवरही झाला. याबाबत बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!