भारत- पाकिस्तान तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द? UGC ने दिली विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती…

मुंबई : नुकताच दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली.
यामुळे आता भारताने कारवाई सुरू केली आहे. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला म्हणून पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. यामुळे आता तणाव निर्माण झाला आहे.
अशी तणावाची परिस्थिती असतानाच सध्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही तासात सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे.
या मेसेज मध्ये एक नोटीस सुद्धा आहे. या नोटीसमध्ये देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा करत सर्व परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे याबाबत विद्यार्थी पालक गोंधळात गेले आहेत. यामुळे नेमकं खर काय याबाबत माहिती पुढे आली आहे.
या संदर्भात युजीसीकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. आयोगाने सांगितल्याप्रमाणे सध्या सोशल मीडियामध्ये जी नोटीस वायरल होत आहे ती बनावट आहे. UGC ने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. UGC च्या नावाने परीक्षा रद्द झाल्याची जी नोटीस व्हायरल होत आहे ती पूर्णपणे खोटी आणि निरर्थक आहे.
यूजीसीने अशी कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही. यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार संपूर्ण देशभरात यूजीसीकडून परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.