Ahmednagar : ८ महिन्यात केली ९ लग्न, शेतकऱ्यांच्या पोरांना फसवलं, धंदेवाईक नवरीला अखेर अटक..

Ahmednagar : आठ महिन्यांत तब्बल ९ तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावणाऱ्या नवरीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. ही लग्न करणारी टोळी असून त्यांच्या नवरीने चक्क ९ लग्ने केल्याचे समोर आले आहे. याप्रकणी श्रीगोंदा पोलिसांनी तब्बल ७ जणांना पकडले आहे
समीरन, सिमरनची आई आशा गौतम पाटील हिच्यासह तिचे साथीदार शेख शाहरूख शेख फरिद, सचिन बलदेव राठोड, अर्जून रामराव पाटील, युवराज नामदेव जाधव, दिपक पांडूरंग देशमुख आदींना ताब्यात घेतले व अटक केली.
नेमकं घडलं काय?
या टोळीला नव्याने एक बकरा मिळाला तो श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव या गावचा. येथील एका तरुणाकडून लग्न करण्याच्या बदल्यात २ लाख १५ हजार रुपये पध्दतशीर उकळण्यात आले. मग रितसर देवाब्राम्हणाच्या साक्षीने लग्नही केले.
मात्र लग्नानंतर लागलीच नोटरी बनविण्याच्या नावाखाली पळून जाण्याच्या बेतात असलेल्या सिमरनची हातचलाखी कुटुंबियांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिला पकडून ठेवून तिच्या नातेवाईकांना पकडून ठेवून पोलिसा्ंना बोलावले आणि बराच मोठा खजिना पोलिसांच्या हाती लागला. सिमरन ही यवतमाळची असून तिची आई व आणखी सहा साथीदारांना तिने यात सामील करून घेतले होते.
तिने राज्यासह गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, मध्यप्रदेशातील लग्नासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या नवरदेवांना हेरले आणि त्यांना लग्नासाठी राजी होण्यासाठी अगोदर हुंडा मागितला आणि त्यानुसार कोणाकडून एक लाख तर कोणाकडून पाच लाख असे पैसे गोळा केले, तिने या कालावधीत एक दोन नव्हे तर केवळ आठ महिन्यात नऊ लग्न केले.
मुंगूसगाव प्रकरणात मात्र ती सापडली. तिला पोलिसांपुढे हजर केल्यानंतर तिचे कारनामे समोर आले. तिच्यासह पोलिसांनी अख्खी टोळी आतमध्ये घेतली. त्यांच्याकडून रोख रक्कम, गुन्ह्यातील वाहन, दागिने असा १३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सिमरनची आई आशा गौतम पाटील हिच्यासह तिचे साथीदार शेख शाहरूख शेख फरिद, सचिन बलदेव राठोड, अर्जून रामराव पाटील, युवराज नामदेव जाधव, दिपक पांडूरंग देशमुख आदींना ताब्यात घेतले व अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.