हवाई ऑपरेशन फत्ते केल्यानंतर आता थेट पाकिस्तानी लष्करावर हल्ला, कारवाईत १४ सैनिकांचा मृत्यू, पाकिस्तानमध्ये हाहाकार…

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. भारताने ७ मे रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन धडा शिकवला तसेच अनेक निर्बंध घातले आहेत. बुधवारी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात मोठ नुकसान झालं आहे.
दुसऱ्याबाजूला बलोच बंडखोरांनी पाकिस्तानाला धक्का दिला आहे. . त्यांनी पाकिस्तानला जखमी केलं आहे. BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवून दिली. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या सैन्यावर आणखी एक हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानच्या सैन्यावर झालेल्या या हल्ल्यात विशेष ऑपरेशन कमांडर आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह १४ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बलुचिस्तान प्रांतात कार्यरत असलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बीएलएने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये लष्करी वाहनावर झालेला हल्ला आणि पाकिस्तानी सैनिकाचे मृतदेह दिसून येत आहे.
पाकिस्तानवर झालेल्या दुहेरी हल्ल्यामुळे पाकचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानच्या लष्करी वाहनाला बलूच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेश्न्स स्क्वाड ने निशाणा करत रिमोट कंट्रोल आयईडी स्फोट घडवून आणला आहे. बलूच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब शोधक आणि विनाशक पथकावरही हल्ला केला. बलूच आर्मीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तान सैन्यातील स्पेशल ऑपरेशन कमांडर तारिक इमरान आणि सुभेदार उमर फारूक यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, बीएलए आणि इतर दहशतवादी गट दशकांपासून पाकिस्तानविरुद्ध बंड करत आहेत. दरम्यान, हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा पाकिस्तान आधीच सुरक्षा आव्हानांना तोंड देत आहे बीएलएच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची सुरक्षा परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.