शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा!! म्हणाले, आता पुरंदर विमानतळासाठी…


पुरंदर : येथील पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यामुळे हे विमानतळ होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ते म्हणाले, पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देण्याऐवजी, त्यांना जो मोबदला अपेक्षित आहे, त्यासह आपण आपल्या मागण्या सरकारकडे सात दिवसांत मांडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही, असेही ते म्हणाले.

या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसेच, भागातील तरुणांचे हाताला काम मिळेल. हा प्रकल्प नागपूरच्या मिहान प्रकल्पाप्रमाणे, पुरंदर विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलेल. नुकत्याच पुरंदर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत त्यांनी आमदार विजय शिवतारे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांशी चर्चा केली. आंदोलनात निरपराध शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी चौकशी केली जाईल. तसेच अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होईल, यासाठी आमच्याकडे गंभीर व्हिडिओ पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाच्या विषयात जिल्हाधिकारी कार्यालयात येथील सात गावातील शेतकऱ्यांसोबत दोन तास बावनकुळे यांनी चर्चा केली. तसेच याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!