टोल देण्याच्या पद्धतीत बदल होणार! ; सहा महिन्यांत नवीन जीपीएस आधारित प्रणाली अंमलात येणार : नितीन गडकरी


नवी दिल्ली : देशात लागोपाठ एक्सप्रेस वे आणि हायवे बनवला जात आहे. त्यामुळे लोकांना अन्य साधनांच्या जागी वाहनांने प्रवास करणे पसंत करीत आहेत. अनेकदा टोल प्लाझावर रांगा लावल्याने अनेक प्रवाशांना संताप व्यक्त करावा लागत आहे. यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल (दि.२४मार्च) रोजी नवी दिल्लीत सीआयआयच्या कार्यक्रमात उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्याची टोल प्रणाली बदलून जीपीएस आधारित नवीन टोल प्रणाली देशात लागू केली जाणार आहे.

या नवीन टोल प्रणालीमुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून वाहनचालकांना अंतरानुसार पैसे भरण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , या अंतर्गत स्वयंचलित कॅमे-यांद्वारे स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याची प्रणाली, कार्यान्वित केली जात आहे, ज्यामुळे वाहने न थांबवता टोल आपोआप कापला जाईल.

 

 

 

 

 

 

 

दरम्यान , फास्टैग लागू होण्यापूर्वी, २०१८ -१९ या आर्थिक वर्षात टोल प्लाझावर सरासरी आठ मिनिटांची प्रतीक्षा वेळ होती, परंतु ही वेळ २०२० -२१ आणि २०२ 1-२२ मध्ये 47 सेकंदांवर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!