उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर चुना हल्ला!!! शेतकरी आक्रमक, नेमकं काय घडलं?


परभणी : आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या विधानाच्या विरोधात शेतकरी संघटनांचा आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस, महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पीकविमा योजनेतील अनियमिततेवर बोलताना पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनीच चुना लावला, असे विधान केले होते. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी परतीचा चुनाच झाला, त्याचवेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी दादांचे विधान म्हणजे जखमेवर मीठ नाही, तर चुना चोळणे आहे, अशी टीका केली.

ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून त्यांनी याबाबत निषेध व्यक्त केला. चुना लावलाय कुणी, आम्ही की तुम्ही? असा संतप्त सवाल करत कार्यकर्त्यांनी पवारांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. यावेळी पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि ताफा पुढे नेण्यात आला. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण झाला.

तसेच शेतकरी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत आहे आणि त्याच्यावर आरोप करणे म्हणजे अन्यायावर शिक्कामोर्तब करणे आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे याठिकाणी वातावरण तापले होते. आधीच विमा कंपन्यांच्या लाभासाठी चाललेल्या योजनेच्या विरोधात असलेल्या शेतक-यांच्या मनात खदखद होतीच, त्यातच हे विधान आल्यानंतर शेतकर्याम्ध्ये संताप होता, तो या चुना आंदोलनातुन प्रकट झाला.

दरम्यान, शेतकरी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत आहे आणि त्याच्यावर आरोप करणे म्हणजे अन्यायावर शिक्कामोर्तब करणे आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे आता अजित पवार चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!