भारताने रात्रभर हवाई हल्ल्याने पाकिस्तानला भाजून काढलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट; कराची बंदर उद्ध्वस्त..

नवी दिल्ली : नुकताच दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये २७ लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली.
यामुळे आता भारताने कारवाई सुरू केली आहे. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला म्हणून पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.
तसेच भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय.
कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली…पाकिस्तानातल्या १६ शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला…अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
पाकिस्तानमध्ये असीम मुनीर संदर्भात जे काही घडतंय ते अत्यंत महत्त्वाचे असून दाट शक्यता आहे की, त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येईल असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि आयएसआय मधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते असे पटवर्धन म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानमधील घडामोडी पाहता शक्यता आहे की, पहलगाम मधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीर यांना जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवला जाईल. आणि असीम मुनीर यांना सर्व गोष्टीसाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य नामनिराळा होईल असा अंदाज ही कर्नल पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.