ओसामाबीन लादेनसाठी बांधलेले गेस्ट हाऊस भारताने उडवले, अनेक दहशतवादी स्थळे केली जमीनदोस्त…

नवी दिल्ली : सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ओसामाबीन लादेनसाठी बांधलेल्या व्हीआयपी गेस्टहाऊसहीत एकुण सहा महत्वाच्या दहशतवादयांच्या इमारती या युध्दात भारतीय सैनिकांनी पाडून टाकल्या आहेत.
भारताने अचूक मारा करीत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डेच उध्वस्त करीत सगळ्या जगासमोर त्यांचे पितळ उघडे केले. यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. आपले जवान सीमेवर तत्पर आहेत. चार दिवस सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पाकिस्तानच्या नांग्याच ठेचून काढल्या.
याबाबत कर्नल विनायक भट यांनी माहिती दिली आहे. त्यांचे ऑनलाईन व्याख्यान पुणे इंटरनॅशनल सेंटर मध्ये प्रसारीत करण्यात आले होते. त्यांनी युध्द संपताच भारताने पाकिस्तानच्या नेमक्या कोणत्या मर्मस्थळावर घाला घालून ती उध्वस्त केली. याची माहिती दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं असताना काल युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानकडून मात्र हल्ले सुरूच आहेत. असे असताना मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
असे असताना मात्र सीमा सुरक्षा दलाने तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.