भय इथले संपले नाही! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; कोरोनाच्या चौथ्या लाटेचे आगमन ?

मुंबई : मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारची तसेच सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, एका दिवसात नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे ४२ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे आगमन झाले आहे का? असा प्रश्न लोकांसमोर उपस्थित झाला आहे.
एका आठवड्याभरात नवीन कोरोना रुग्नाची संख्या झपाट्याने वाढल्याची दिसत आहे, जिल्ह्यातील प्रभावित बाधितांची संख्या नमुन्यांपैकी ४२ अहवाल बाधित निघाले आहेत. ती संख्या जवळजवळ २२५ झाली आहे. पाच महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे.
दिवसभरात तपासण्यात आलेल्या ३४४ पैकी ४२ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात नागपूर शहरातील ३० रुग्ण आहेत. तर उर्वरित १२ जण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील रुग्णसंख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा कोविड सेंटर सुरू झाले आहेत. सध्या १० कोविड सेंटर सुरू झाले असून येथे २० प्रभावित कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.