मोठी बातमी! मुंबई- आग्रा मार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा चिरडून मृत्यू…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. बुलढाणा येथे झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असताना आता पुन्हा एकदा मोठा अपघात झाला आहे. धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं.

याच गावाजवळ साधारणतः दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला.

या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यामुळे आता जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!