संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, सर्वात मोठ्या अधिकाऱ्यालाही अचानक बोलावलं, सीमेवर काहीतरी मोठं घडतंय?


पहलगाम : काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यामुळे काहीतरी घडत असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला अति महत्त्वाचे अधिरकाही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीत मोठी रणनीती ठरल्याचे बोललं जात आहे. नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने पाकिस्तानला थेट इशारा आधीच दिला आहे. यामुळे भारताकडून बदला घेण्याचे काम सुरू आहे.

आज सकाळीच राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवास गाठले. यावेळी त्यांच्यासोबत तीन सैन्याचे प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. रात्रीच्या बैठकीला फक्त राजनाथ सिंह उपस्थित होते. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता दोन्ही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले. यावेळी त्यांची मोदींसोबत 40 मिनिटे चर्चाा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. असे असले तरी या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राजनाथ सिंह दोनदा पंतप्रधानांना भेटले आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही मोदींना भेटल्याने अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत. रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर बैठक झाली. तिन्ही सैन्याची कमान सांभाळणारे सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंह यांच्याशी बैठक केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!