ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ‘तुतारी’चे 5 खासदार फुटणार असल्याचा दावा; तारीखही समोर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भातही एक मोठा दावा समोर आला आहे. अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील तब्बल पाच खासदार आणि काही आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, असा दावा केला आहे.

आत्राम यांनी म्हटले की, आगामी काळात शरद पवार गटातील अनेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि राजकीय भवितव्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, राज्यात आधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरत आहे.

धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या पक्षातील नेते आणि खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
