राहुल गांधींनी लाल चौकात फडकावला तिरंगा ! काश्मीर खोऱ्यात निनादला राष्ट्रप्रेमी सूर…!

जम्मू : भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यावर आहे. श्रीनगरच्या एसके स्टेडियमवर उद्या जाहीर सभा होणार आहे. यामध्ये 23 विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर ही यात्रा संपेल.

लाल चौकातील कडेकोट बंदोबस्त भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी सकाळी पांथा चौकातून निघालेला मोर्चा श्रीनगर शहरातील बुलेवर्ड रोडवरील नेहरू पार्कजवळ संपला. दरम्यान, राहुल गांधींनी दुपारी लाल चौकात तिरंगा फडकावला. यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.
30 जानेवारीला एसके स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. यामध्ये 23 विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर ही यात्रा संपेल.तत्पूर्वी, शनिवारी सुरक्षेतील हलगर्जीपणाच्या घटनेनंतर परांधिग येथून सुरक्षात्रिस्तरीय बंदोबस्तात अवंतीपोरा या चुरसू गावातून यात्रा पुन्हा सुरू झाली.

यानंतर बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल, गलांदर, पंपोर मार्गे ही यात्रा पांथा चौकात आली. पुलवामा येथून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती आणि मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते राहुल यांच्या यात्रेत सामील झाले. याशिवाय प्रियांका गांधीही पुलवामामध्ये सहभागी झाल्या होत्या.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की भारत जोडो यात्रा ही काश्मीरमधील ताज्या हवेच्या श्वासासारखी आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने लोकांना 2019 नंतर प्रथमच घराबाहेर पडण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बाहेर पडू दिले नाही.
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. भारत जोडो यात्रेसाठी अगोदरच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यात्रेच्या सुरुवातीच्या ठिकाणाकडे जाणारे सर्व रस्ते सुरक्षा दलांनी सील केले.
केवळ अधिकृत वाहने आणि पत्रकारांना यात्रास्थळी जाण्याची परवानगी होती. राहुल गांधींच्या भोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था होती. दक्षिण काश्मीरच्या चुरसू परिसरात यात्रेचे उत्साही समर्थकांनी स्वागत केले. तिरंगा आणि पक्षाचे झेंडे घेऊन निघालेल्या यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पांढऱ्या टी-शर्ट आणि स्लीव्हलेस जॅकेटमध्ये राहुल गांधींनी पदयात्रेला सुरुवात केली होती.