राहुल गांधी पुन्हा अडचणीत, आता पुण्यात घडली मोठी घटना


 

पुणे : इंग्लंड येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. सावरकर यांच्याविषयी मते कलुषित करण्याच्या दृष्टीने आणि बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केले आहे.

त्याची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले. या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे.

यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना थेट न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सावरकर कुटुंबीयांनी घेतला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

दरम्यान, मानहानीचा दावा दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द करण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी मी सावरकर नाही तर राहुल गांधी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!