मुंबईत धक्कादायक घटना! १५ वर्षांच्या पोरीचा १९ वर्षीय पोरावर जडला जीव, घरच्यांनी नकार दिल्यावर घेतला टोकाचा निर्णय, स्टेशनवर गेले अन्….

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपवल्याची ही घटना उघडकीस आली आहे. आपला जीव देणारं हे प्रेमी युगुल अल्पवयीन होतं.
यापैकी मुलीचं वय हे १५ तर मुलाचं वय १९ वर्ष असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या एक्स्प्रेसमोर उडी घेत एकत्र आयुष्य संपवलं.
लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ही पुढे आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २६ जानेवारीच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यातील पंधरा वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. या दोघात जवळीक असून प्रेम प्रकरणाला प्रांतीय अथवा जातीय अँगल असून लग्नाला विरोध केल्याने ही घटना घडलीय का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे दोघेही भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहे.
ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र मधातच ही मुलगी आजीपासून बाजूला झाली. त्यानंतर ती गायब असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांतर्फे शोधाशोध केली असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण आज उजेडात आले आहे. परिणामी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.