Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजितदादांना घाम फुटला अन्..! भुजबळांनी निवडणुकीच्या तोंडावर सगळंच सांगून केला गौप्यस्फोट…


Chhagan Bhujbal : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. मतदार राजाला खुश करण्यासाठी अनेक आश्वासणे दिली जात आहे.

या रणधुमाळी राष्ट्रवादी अजित पावर गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.

ईडीच्या भयानेच सरकारमध्ये सहभागी झाल्याचं छगन भुजबळ यांनी पुस्तकात कथन केलं आहे. तसेच सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका, ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला, माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, असं छगन भुजबळ यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

तसेच मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते, असंही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. Chhagan Bhujbal

या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती.

यावर तोडगा कसा काढायचा यावर खल झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या, असे पुस्तकात कथन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!