Census In India : पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय, जनगणनेची पद्धतही बदलणार, जाणून घ्या…

Census In India : केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या जनगणनेची माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून देशात जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना २०२५ पासून सुरू होईल आणि २०२६ पर्यंत चालेल. अशी माहिती समोर आली आहे.
२०२१ मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे देशात पुढच्या वर्षात जनगणना करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे, अशी माहिती मिळत आहे. Census In India
पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत १९९१, २००१, २०११ इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती.
पण, आता २०२५ नंतर पुढील जनगणना २०३५,२०४५, २०५५ अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, २०२८ पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.