Sonia Gandhi : वातावरण फिरलय, काँग्रेसच्या बाजूने आलंय, हलगर्जीपणा करू नका, सोनिया गांधींचे आदेश….


Sonia Gandhi : लोकसभा इंडिया आघाडीमध्ये काँगेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळाले आहे. लोकसभेत काँगेसच्या खासदारांची संख्या १०० आहे. त्यामुळे भाजपला केंद्रात तगडे आव्हान मिळाले आहे. आता माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

सध्या वातावरण काँग्रेसच्या बाजूने आहे, पण ही गती कायम राखणे आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाने जी विश्वासार्हता निर्माण केली आहे, ती टिकवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या आहे.

तसेच आपल्याला अतिआत्मविश्वास असण्याची गरज नाही. जर आपण चांगली कामगिरी केली तर लोकसभा निवडणुकीतील वातावरणाच्या आधारे राष्ट्रीय राजकारण बदलेल, असेही त्या म्हणाल्या आहे. Sonia Gandhi

आगामी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या तर त्याचा राष्ट्रीय राजकारणावर विशेष परिणाम होईल, त्यामुळे तयारीला लागा. वारा आपल्या बाजूने आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या आणि विशेषत: तरुणांच्या ज्वलंत मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या आहे.

आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या की, जातीय जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. यामुळे देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची खरी माहिती देशासमोर येणार नाही.

याचा अर्थ असाही होतो की आमचे किमान १२ कोटी नागरिक २०१३ च्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत, ज्याचे आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना असे नामकरण करण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!