Abdul Sattar : १० दिवसात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार?!! अब्दुल सत्तार यांनी सगळंच सांगून टाकलं….


Abdul Sattar : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली, यासाठी एकनाथ शिंदे यांचा मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांना माफ केलेले पैसे जिल्हा बँकेला सरकारने १०० कोटी रुपये वापरायला द्यावे. १५० कोटी व्याज हे शेतकऱ्यांना भुर्दंड असून तो कमी करण्यासाठी सरकारने मदत करावी.

बँकिंग व्यवहारात हे मंदिर ( जिल्हा बँक ) चालवायची असेल तर शासनाची मदत लागेल. १०० कोटी रुपयांच पॅकेज हे बँकेला द्यावे. शेतकऱ्यांना माफ केलेले पैसे हे दहा वर्ष बँकेला वापरायला द्यावेत, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे केली आहे.

अजित पवार यांनी कालच सांगितले की वीज मोफत मिळेल. पंजाब नंतर महाराष्ट्र राज्य असेल जिथं वीज बिल माफ असेल. शेतकऱ्यांना साडे सातच्या मोटारीला वीज बिल भरावे लागणार नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले. Abdul Sattar

अल्पसंख्यांक समाजाला देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता, तेवढा निधी हा एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मिळाला. अल्पसंख्यांक समाजाला आतापर्यंत जो निधी मिळाला नाही, तो निधी आता मिळणार आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

या दिवसात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार…

“मी मनोज जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला होता. बाकीचे खडकु छाप लोकमध्ये येतात. मनोज जरांगे यांनी मागणी केली, त्यांचा मी सन्मान करतो. बाकी मला जे काही बोलत आहेत, ते खडकु छाप बडबड करतात असं लक्ष्मण हाकेना उद्देशून म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. १० दिवसात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार, असे अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!