तुम्ही बदनाम का होताय? उद्धव ठाकरेंचं फडणवीसांबद्दलचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय घडलं?


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन केलं आहे. तसेच त्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त कृत्यावरून आणि वक्तव्यावरून ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली.

अधिवेशनात रमी गेम खेळणारे माणिकराव कोकाटे, काळी जादू केल्याचा आरोप असणारे भरत गोगावले, हॉटेल रुममध्ये पैशांची बॅग घेऊन स्टे केल्याचा आरोप असलेले संजय शिरसाट अशा विविध नेत्यांवर ठाकरे गटाने कडाडून घोषणाबाजी आणि टीका केली आहे.

या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भ्रष्टाचारी नेते आणि मंत्र्यांवर जहरी टीका केला. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख करत त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाल्याचं म्हटलं. शिवाय आपल्याला त्यांची कीव येत असल्याचं देखील ठाकरे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांची मला कीव येते. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. वरती तिकडे दिल्लीत त्यांचे बापजादे बसलेत. तरी सुद्धा त्यांची हिंमत होत नाही, भ्रष्टाचाऱ्यांना काढण्याची. काही वेळासाठी असं समजू की स्वत: देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचार केला नाही.

मग ते एवढी बदनामी का ओढावून घेतायत. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या चुकांवर पांघरून का टाकताय? तुमच्याकडे बहुमत असून, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, भाजपा अर्थात भ्रष्टाचारी जनता पक्ष तुमच्याकडे आहे.

तरीही तुम्हाला कारवाई करता येत नाही. भाजपकडे जसं अध्यक्ष करायला माणूस नाही. तसं हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे घ्यायला तुमच्याकडे (फडणवीस) लोक नाहीत का? तुमच्यावर कुणाचा दबाब आहे? हा भ्रष्टाचार त्यांना पटतोय का? हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं. नाहीतर त्यांनी सांगावं, भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे, पण माझं असं झालंय की सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्र सोडलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!