मनोज जरांगेच्या पाठीमागे कोणाची ताकद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले……

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनात पाच हजार लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना जरांगे यांच्या पाठीमागे कोणाची ताकद असल्याचं म्हटल आहे. आजही आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण आहेत? असं म्हटलं आहे.

जरांगेंच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी पक्षातील आंमदारांचा पाठिंबा आहे. विजयसिंह पंडित (अजित पवार गट), राजू नवघरे अजित पवार गट), विलास भुमरे (शिंदे गट) आणि प्रकाश सोळंके (अजित पवार गट) यांचा आमदारांचा जाहीरपणे पाठिंबा असून ते आंदोलनामध्येही सहभागी झाले आहेत. तर मविआमधील आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, (राष्ट्रवादी शरद पवार गट), खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) यांचा पाठिंबा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत बोलताना म्हणाले, काही राजकीय पक्ष मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचं नुकसान होईल, फायदा काही होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा निशाणा कोणावर याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
