भारताने हल्ला करून बदला घेतल्यानंतर पाकिस्तानी लोकं गुगलवर काय सर्च करत आहेत? समोर आली वेगळीच माहिती..

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. भारताने ७ मे रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन धडा शिकवला तसेच अनेक निर्बंध घातले आहेत. बुधवारी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात मोठ नुकसान झालं आहे.
७ मे रोजी भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट करत ते पूर्णपणे उद्धवस्त केले. ज्यामुळे हा प्रसंग प्रत्येक भारतीयांसाठी मोठा क्षण ठरला. आता सोशल मीडियावर सर्वत्र याच हल्ल्याची चर्चा सुरु आहे.
पण या सगळ्यात लोकांना एका गोष्टीची उत्सुक्ता आहे ते म्हणजे पाकिस्तानी आता काय करत असतील किंवा त्यांच्या देशात या हल्ल्यानंतर काय परिस्थिती असेल? खरंतर पाकिस्तानात आता गुगवर बहुतांश नागरिक काय सर्च करत आहेत हे गुगल ट्रेडच्या माध्यमातून समोर आलं आहे.
गुगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानमधील सर्वाधिक सर्च होणाऱ्या कीवर्ड्समध्ये ‘बहावलपूर’ हा शब्द पहिल्या स्थानी आहे. अवघ्या काही तासांत तो 2 लाखांहून अधिक वेळा सर्च करण्यात आला आहे. याशिवाय ‘Dassault Aviation share price’ हा शब्द देखील मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे, ज्यावरून स्पष्ट होते की पाकिस्तानी जनता भारताच्या राफेल विमानांची किंमत आणि क्षमता समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे.
आश्चर्य म्हणजे पाकिस्तानात quetta gladiators vs islamabad united हा शब्द मागच्या २४ तासात सर्वाधिक ट्रेंड होतं. ही पाकिस्तान क्रिकेट लिगमधील मॅचची अपडेट आहे. ‘Rafale’ व ‘Indian News Channel’ हे कीवर्ड्स सुद्धा पाकिस्तानमध्ये गुगलवर ट्रेंड करत आहेत. यावरून स्पष्ट होतं की, भारताच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानमधील लोकही आता भारतीय सामर्थ्याची दखल घेत आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सनी दावा केला की त्यांनी भारताचे राफेल विमान पाडले आहे. मात्र भारत सरकार किंवा लष्कराकडून अशा कोणत्याही घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेले सर्व हल्ले भारतीय हद्दीतून टार्गेट करून केले आहेत. मग अशा परिस्थितीत पाकिस्तानने राफेल कसे पाडले असते? हे केवळ त्यांच्या जनतेची दिशाभूल करणं आहे.