उरुळीकांचनसह दौंड व शिरुरच्या पर्यटक उद्या विमानाद्वारे परतणार! तत्पर व्यवस्थेने ७० हून पर्यटकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास…


उरुळीकांचन : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिह्यातील पेहलगाम जवळील बायसरन गार्डन मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात २७ देशवासियांचा बळी गेल्यानंतर या हल्यात केवळ दहा मनिटे उशिरा झाल्याने देवबत्तर म्हणून हल्यातूनवाचलेल्या उरुळीकांचन तसेच परिसर ,दौंड व शिरुर तालुक्यातील ७० पर्यटकांची उद्या म्हणजे (दि.२४ ) श्रीनगर एअरपोर्ट मधून विमानाने परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व प्रवासी स्थानिक सुरक्षितेत दुपारी२च्या विमानाने मुंबईत परतणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.

पेहलगामजवळील बायसरन गार्डन मध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्यात २७ देशवासिय पर्यटन मृत्यूमुखी पडले आहेत. या हल्याने संपूर्ण देश हादरल्यानंतर उरुळीकांचन येथील मेलडी टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित केलेल्या जम्मू कश्मीर सहलीसाठी गेलेल्या ७० हून अधिक पर्यटकांनी व्हिडीओ जारी करुन आम्ही या हल्यासाठी अडकून पडले असून आम्हाला मदत मिळण्यासाठी राज्य सरकार ,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्ञानेश्वर कटके व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना व्हिडीओ द्वारे भेदरलेल्या ७० पर्यटकांनी मदतीची याचना केली होती. या हल्यावेळी घटनास्थळावरून काही अंतरावर असलेल्या या पर्यटकांत प्रचंड भितीचे वातावरण पसरल्याने हे पर्यटक भेदरलेल्या अवस्थेत रात्र काढून त्यांनी बुधवारी सकाळी व्हिडीओ शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार माऊली कटके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्या संपर्कात राहून त्यांनी या पर्यटकांना श्रीनगरमध्ये पोहचण्यासाठी व्यवस्था , स्थानिक मदत तसेच परतीसाठी विमानाची व्यवस्था केली आहे. त्यानुसार या सर्व पर्यटकांना मोफत विमानाची सुविधा मुरलीधर मोहोळ यांनी उपलब्ध करुन दिली आहे. हे सर्व पर्यटक उद्या दुपारी २ च्या विमानाने मुंबईला परतणार आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

प्रशासन तत्पर सेवा..

पेहलगाम मध्ये रात्र काढावी लागलेल्या या ७० पर्यटकांनी बुधवारी सकाळी सोशल मिडीतून मदतीचा व्हिडीओ शेअर केल्या नंतर राज्य प्रशासन तसेच मुख्यमंत्री साह्यता कक्ष,जिल्हा प्रशासन यंत्रणा या यंत्रणा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेने तत्काळ कामाला लागून या पर्यटकांच्या मदतीला धावल्या आहेत. जम्मू काश्मीर प्रशासनाने त्यांना तत्पर मदत करीत सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. त्यामुळे योग्य मदत मिळाल्याचे मेलडी टुर्स अँड ट्रॅव्हलच्या संयोजक ज्योती झुरंगे यांनी सांगितले. त्यांना स्वतः ला वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधून प्रशासनाची मदत होत असल्याची माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!