राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन जणांचा मृत्यू…!


मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यांत अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात ३४३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण १७६३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ८,६५,७१,६७३ इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी ९.४० टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.

पुणेकरांची चिंता वाढली
शुक्रवारी राज्यात ३४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनाच्या तीन मृत्यूची नोंद झाली आहे

तीन कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद
राज्यात एकूण १९४रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण ७९,९०,८२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१६ टक्के इतके झाले आहे. राज्यात तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्युदर हा १.८२ टक्के इतका झाला आहे.

प्रशासनाकडून पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन
पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेतले जाऊ शकते पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!