एक काळ होता देशात 5 हजार आणि 10 हजारच्या नोटाही चलनातून केल्या होत्या बाद, कारण…


नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. यापुढे या नोटा छापल्या जाणार नाहीत. तसेच या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीरित्या वैध राहतील.

त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत. एकेकाळी देशात ५००० आणि १०००० च्या नोटाही चलनात होत्या.

जे नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन चलनातून काढून टाकण्यात आले. २००० रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचा निर्णय नोटाबंदीच्या अंतर्गत येत नाही. केवळ या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा मुद्दा आहे.

१६ जानेवारी १९७८ रोजी जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने १०००, ५००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. यामुळे याची देखील बरीच चर्चा झाली होती.

तेव्हा सरकारने ही नोटबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला सर्व बँका आणि त्यांच्या शाखांना त्यांचे ट्रेझरी विभाग व्यवहारांसाठी बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. तसेच क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. यामुळे आता नोटबंदी नवीन राहिली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!