भाजपने ९ वर्षांत ९ सरकारे पाडली, लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भाषण करत मोदी शहांना घेरलं…


नवी दिल्ली : मागील ९ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने देशातील ९ राज्यातील बिगर भाजप सरकारे पाडली आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर बोलताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप केला आहे. जनतेला खोटी आश्वासनं (जुमले पे जुमला) दिली जात आहेत. देशाची औद्योगिक आणि आर्थिक स्थितीही वाईट आहे.

एवढच काय तर अनेक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मणिपूर, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.

सुळे पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या काळात देशात मोठ्य़ा प्रमाणात महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. कृषी मालाला योग्य दर दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

कांदा, दूधला दर दिला जात नाही. देशात महागाईबरोबर बेरोजगारीही वाढली आहे. एलआयसीची विक्री करण्याच्या प्रयत्न सरकार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांवर विक्रीची टांगती तलवार आहे.

मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. परंतु, या ट्रेनचा गरिबांसाठी काहीच उपयोग नाही. ज्या ठिकाणी रेल्वे मार्गावर थांबा होता, ते बंद केले आहेत, असे सांगून वंदे भारत ट्रेनला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपा जेव्हा सरकारमध्ये नव्हती तेव्हा त्यांचे नेते ‘पार्टी विथ द डिफरन्स’ असे म्हणत होते. पण कुठे आहे तुमची ही ‘पार्टी विथ द डिफरन्स’? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!