प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ! महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा….


पुणे : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामु लाखो विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही सर्व प्रमाणपत्र जोडावी लागतात. यासाठी खर्च येतो. या प्रतिज्ञापत्रकासाठी लागणारा साधारणता खर्च आता महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे वाचणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आता जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता जोडावे लागणार नाही. या निर्णयामुळे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्ज लिहावा लागणार आहे. साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे.

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. हा निर्णय तत्काळ लगेच लागू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!