दुष्काळाने ज्वारीला सुगीचे दिवस ! जाणून घ्या ज्वारीचे दर ..!!

सोलापूर : कांद्याचे वाढलेले दर अचानक कमी झाल्याने शेतकरी मध्यंतरी चिंतेत होते. परंतु या आठवड्यात धान्य बाजार चांगलाच तेजीत आहे. यात ज्वारी देखील समावेश आहे. शेतकऱ्यांच्या ज्वारीला चांगला भाव आल्याने शेतकऱ्यांना या भावाने समाधान व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. यंदा पाऊस वेळोवेळी कमी पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. परंतु ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत.
भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात आहे. पाथर्डीच्या बुधवारच्या आठवडे बाजारात ज्वारी ७१०० रुपये क्विंटल इतका मोठा भाव घेऊन पहिल्या क्रमांकावर कायम राहिली आहे.
दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित न केल्यास ज्वारीचे दर किमान ९ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये देखील जेमतेम वाढ झालेल्या ज्वारी पाखरे खातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे थोडाफार माल आहे, ते विक्रीला आणत नाहीत.
यंदा फक्त ज्वारी नाही तर गव्हासह बाजरीचे दर गगनाला भिडले आहेत. आठवडे बाजारात बाजरी ३०००, गहू तीन ते तीन हजार ४०० रुपये, सोयाबीन ४७००, कापूस ७ हजार आणि तूर ८५०० रुपये क्विंटल पर्यंत गेली आहे. एलनिनो वादळाचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसावर होण्याची शक्यता आहे. समजा असे झाले तर धान्याचे भाव आणखी वाढतील.
दरम्यान, ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात सर्वात मोठी वाढ झाली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत. सरलेल्या मान्सूनमध्ये पावसाने घोर निराशा केल्याने ज्वारीचे दर वाढले आहेत. जर येत्या काळात बाजार समितीत कमी आवक झाली तर दर आणखी वाढू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.