…म्हणून शाहीद आफ्रिदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन ? कारण आले समोर….

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानचे संबंध अनेक वर्षांपासून तनावाचे राहिले आहेत. यातच हा विषय क्रिकेटमध्ये देखील येतो. सध्या पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. असे असताना भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे.
असे असताना आता शाहीद आफ्रिदी यासाठी पुढाकार घेणार असून तो मोदींना विनंती करणार आहे. स्वत: शाहीद आफ्रिदीने हे म्हटले आहे. दोहा येथे लिजेंडस लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होती. तिथे बोलताना शाहीद आफ्रिदीने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने यामध्ये उडी घेतली आहे. दोन्ही देशामध्ये क्रिकेट सुरु व्हावं, यासाठी मी मोदी साहेबांना विनंती करेन, असे लिजेंडस लीग क्रिकेट खेळायला आलेला शाहीद आफ्रिदीने म्हंटले आहे.