Sharad Pawar : शरद पवारांचे अमित शहांबद्दल धक्कादायक वक्तव्य म्हणाले, त्यांना…


Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील दहा वर्षात शेती संबधीचे प्रश्न वाढले आहेत. हा कालखंड अमित शाह यांच्या पक्षाकडे होता. या कालावधीत त्यांनी काय केलं ते सांगावे, असे म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले की, अमित शाह यांचे शेती संबधीच ज्ञान मर्यादीत, त्यावर जास्त काय बोलायचे? ⁠त्यांनी दहा वर्षात काय केले ते सांगावं. वीस वर्ष आधी काय झाले, चाळीस वर्ष आधी काय झाले हे विचारु नये, असं म्हंटले आहे.

जयंत पाटील यांनी देखील साधला निशाणा..

शरद पवार कृषीमंत्री असताना आत्महत्या पाहून मनमोहन सिंग यांना विदर्भात आणून कर्जमाफी करायला सांगितली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मागणी केली त्याचा आनंद आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून त्यावर अमित शहांकडे काय उत्तर आहे?, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!