Sharad Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांनी अजितदादांना झापलं, म्हणाले, सत्ता हातात असल्यावर…

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता दोन दिवस राहिले आहे. प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रॅली काढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना झापले आहे.
भोरमध्ये येऊन काही लोक (अजित पवार) सांगतात, साखर कारखाना चालवता आला नाही म्हणतात, दोन दिवसांपूर्वी मी शिरूर विधानसभेत होतो, तिथे देखील ते असंच म्हणाले आहे.
साखर कारखाना कसा चालवतो हे मी बघतो, अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, सत्ता तुमच्या हातात आली, सत्ता हातात आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात, डोके शांत ठेवायचे असते, संकटात असणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, उलट हे दमदाटी करत आहेत. Sharad Pawar
ठीक आहे, सत्ता हातात आहे, त्याचा असा गैरवापर तुम्ही करत आहात. पण तुमच्या या भाषेला आणि दमदाटीला मतदार अजिबात भीक घालणार नाही. यांचा निकाल आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आहे, असं म्हणत शरद पवारांनीअजित पवारांना लक्ष्य केले आहे.
भोरमधील काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यासाठी शरद पवारांनी जाहीर सभा घेतली, यावेळी त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभेत आमचे केवळ सात खासदार होते, मात्र, या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने मोठा विश्वास दाखवला आणि आमचे एकतीस खासदार निवडून दिले. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. यावेळी अमुलाग्र बदल घडवायचा आहे, असेही शरद पवारांनी यावेळी म्हंटलेआहे.