ब्रिटिश कालीन कलमे होणार हद्दपार! आयपीसी कलम 511 वरून 356 वर कमी होणार! आता हत्येसाठी 302 ऐवजी 101 …


नवी दिल्ली : मोदी सरकारने ब्रिटीश कालीन कायदे व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारत देशात स्वातंत्र्य पूर्व काळापासून अंमलात असलेले कायदे आत हद्दपार होणार आहे. त्यामुळे भारतीय कायदे आता आयपीसी ऐवजी भारतीय न्याय संहिता म्हणून लवकरच अस्तित्वात येणार असून त्यात आयपीसीतील ५११ कलमांची संख्या घटून ३५६ होणार आहे.

कायदे कलम बदलाचा भाग म्हणून महत्त्वाची कलमे असलेल्या खून करणे कलम ३०२ ऐवजी १०१ तर   फसवणुकीचे कलम ४२० ऐवजी ३१६ असेल हा बदलाचा महत्त्वाचा भाग होणार आहे. जमावबंदी कलम १४४ ऐवजी आता १८७ कलम अंतर्गत सामावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

केंद्र सरकारने भारतीय दंड विधान (आयपीसी) ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) ऐवजी दंड प्रक्रियेशी संबंधित कायद्यांना एकत्रित तसेच त्यात दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ आणि निष्पक्ष सुनावणीसाठी पुराव्याचे भारतीय पुरावा विधेयक, २०२३ ही विधेयके सूचीबद्ध केली आहेत.

 

गेल्या काही वर्षांत नवीन कलमे आणि उपकलम समाविष्ट केल्यामुळे दंड संहिता जड झाले आहे. कायदे अधिक समकालीन आणि स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा तर्क केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेत आयपीसीच्या ५११ कलमांऐवजी आता केवळ ३५६ कलमे असतील. यातील १७५ मध्ये दुरुस्ती केली जाईल. आठ नवीन खंड जोडण्यात आले असून २२ खंड रद्द करण्यात आले आहेत.

जवळपास ४० वर्षे जुना फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) जागी भारतीय नागरी सुरक्षा विधान आणि भारतीय पुरावा कायद्यात अधिक कलम असतील. त्यांना अधिक प्रासंगिक बनवण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!