पाकिस्तानची जिरवली पण चीनच घाबरली!! चीनची भाषा बदलली, पाकिस्तानची साथच सोडली..

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने उत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यामुळे पंतप्रधान मोदींनी हा एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
हे हल्ले पहाटे 1:30 च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना न्याय मिळाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा भारताने दिला होता.
असे असतांना अगोदर पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिलेल्या चीनने आता भाषा बदलली आहे. पाकिस्तानसाठी कायम सहकार्य करण्याची भाषा करणाऱ्या चीनने आता त्यांनाच सल्ला दिला आहे. पाकिस्तानने आता संयमाने घ्यावं, असा सल्ला चीनने दिला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, असं पाकिस्तानने काही करु नये, असं चीनने सांगितले आहे.
तसेच भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. भविष्यातही दोघेही शेजारी राहतील. अशा परिस्थितीत दोघांनीही हा प्रश्न शांततेने सोडवावा. शांततेसाठी आणि व्यापक हितासाठी काम करण्याची गरज आहे, आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनचे शेजारी आहेत.
चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो असेही म्हटले आहे. दरम्यान, भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर आता चीनचीही चांगलीच टरकली आहे. भारताच्या या कारवाईनंतर आता चीननेही त्यांची भूमिका बदलली आहे. चीनने पाकिस्तानची साथ सोडली आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी राजदूतांनी 3 दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत चिनी राजदूतांनी पाकिस्तानला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. मात्र भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता चीनने आपली भूमिका बदलली आहे.