भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संताप!! सडेतोड उत्तर दिलं जाईल, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तीव्र प्रतिक्रिया

कराची : भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला.यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईला “युद्धाची कृती” म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे.
भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि आमचं मनोधैर्य मजबूत आहे. पाकिस्तान आणि त्याचं सैन्य शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे जाणून आहे. आम्ही शत्रूच्या कोणत्याही वाईट हेतूला यशस्वी होऊ देणार नाही. असेही ते म्हणाले.
भारताने दहशतवादी छावण्यांच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. असे या हल्ल्यांबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आरोप केले आहेत.
ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना पाकिस्तानमध्ये येऊन परिस्थितीची सर्व बाजूंनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानं पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी तळांवर हल्ला करुन, पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर तर दिलं, पण त्यासोबतच पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे.
भारतात वारंवार दहशतवादी कारवाया करत निष्पापांचा बळी घेणाऱ्या, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना निर्घृणरित्या मारणाऱ्या दहशतावाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले केले.