महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे आदेश, जाणून घ्या महत्वाची माहिती..

पुणे : देशात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले आहेत. या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील एकूण २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या २४४ जिल्ह्यात मॉक ड्रिलची केंद्र सरकारची योजना आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. हे जिल्हे भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेले असून यामध्ये जम्मू कश्मीर, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात.
महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, उरण, तारापूरसह अलिबाग, रोहा, पुणे, पिंपरीमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. तर औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील मॉक ड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीतून बचाव करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये सायरन वाजल्यावर तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं. 5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा. सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका. फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा. घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे थांबा. संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल अशा ठिकाणी लपा.
तसेच टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या. अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा. असे सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरी संरक्षणाची सिद्धता तपासण्यासाठी ही रंगीत तालीम राज्याराज्यात होणार आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल.
मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे. रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे? हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची? याबाबत माहिती दिली आहे.