भाग्यविधाते कर्मयोगी कै.डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

उरुळी कांचन : उरुळी कांचनचे भाग्यविधाते कर्मयोगी कै.डॉ. मणिभाई देसाई यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था मर्या उरळी कांचन व विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार 27 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.एन.जी. हेगडे साहेब होते. यावेळी माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी सरपंच ज्ञानोबा तुळशीराम कांचन, अभिषेक देवीकर, डॉ.सचिन कातकाडे उपस्थित होते. डॉ.मणिभाई देसाई यांनी बायफ, निसर्गोपचार आश्रम, महात्मा गांधी सर्वोदय संघ, यशवंत सहकारी साखर कारखाना इ. संस्थांची स्थापना करून ग्रामीण विकासाची पायाभरणी केली.
त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधून लोकपयोगी कामे आजही चालू आहेत. सन 1993 साली राजेंद्र बापू कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनी पतसंस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीतून केली त्यांच्या कामामध्ये सातत्य असल्याने संस्था नावारुपाला आली. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात असे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
सदर रक्तदान शिबिरामध्ये 123 रक्तदात्यांनी सहभाग घेतला व 450 नागरिकांनी मधुमेह तपासणी, इ.सी.जी, पी.एस.ए., हिमोग्लोबिन, रक्तदाब, हाडांची ठिसूळता व मोफत तपासणीचा लाभ घेतला. 180 नागरिकांनी नेत्र तपासणीचा व मोफत चष्मे वाटप शिबिराचा लाभ घेतला. 133 लोकांनी दात्री ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित ब्लड कॅन्सर तपासणीचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमासाठी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
निसर्गोपचार आश्रम व पतसंस्था यांच्या वतीने संस्थेच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेस 31 मार्च 2025 अखेर 6 कोटी रुपये नफा झाला आहे. तसेच 312 कोटी 15 लाख ठेवी व 228 कोटी 66 लाख येणे कर्ज असून गुंतवणूक 120 कोटी 45 लाख अशी आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितली.
उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले. यावेळी संचालक शरद वनारसे, भाऊसो कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, संजय टिळेकर, खेमचंद पुरुसवाणी, ह.भ.प. जीवन शिंदे, धनसिंग पोंदकुले, अनिकेत कांचन, सारिका काळभोर, कमल कांचन, रोहिदास उंद्रे, प्रवीण दरेकर, सुभाष धुकटे, जनार्दन गोते इत्यादी व सर्व शाखांचे सल्लागार उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता काळे यांनी केले.