पुढील चार दिवस अतिमहत्वाचे! उष्णतेची येणार तीव्र लाट, 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार, काळजी घ्या…


पुणे : सध्या राज्यात प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. यामुळे अनेकांना त्रास होत आहे. किमान तापमान वाढू लागल्याने वातावरणातील कोरडेपणा आणि उष्णतेची तीव्रता यामुळे सध्याचा उन्हाळा असह्य होतो आहे. यामुळे पुढील काळात काळजी घ्यावी लागणार आहे. असे असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

भारतीय हवामान खात्याने एक इशारा दिला आहे. ज्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशासाठी एक अलर्ट दिला असून यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील पाच दिवसात राज्यात तापमानात आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच गुजरातमध्ये देखील पुढील चार दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे. यामुळे उन्हात बाहेर न पडल्याचे सांगितले जात आहे. आणखी तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याची मत व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सावधानता बाळगावी.

शरीराला आल्हादायक अशा पेयांचा वापर करावा. जास्तीत जास्त पाणी प्यावे. डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहने, मोबाईल यांची देखील काळजी घ्यावी. कार किंवा दुचाकी मध्ये पूर्ण टाकी भरेल एवढे इंधन भरू नये. मोबाईल उष्णतेच्या ठिकाणी चार्जिंग करण्याचा प्रयत्न करू नये, अशा प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे.

देशाच्या वायव्य भागात मागील चार-पाच दिवसात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उष्णतेची लाट पाहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. यामुळे आता पुढील चार दिवस काळजी घ्यावी लागणार असून पूर्ण एक महिना काळजी घ्यावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!